मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केल्यानंतर माजी उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगावर प्रखर शब्दात टिका केली. ‘निवडणुक आयोग नव्हे चुना आयोग’ असं म्हणत आता निवडणुक आयोगाच्या अध्यक्षाची नेमणुक निवड समितीमार्फत घेण्याची मागणी केली होती. याचसंदर्भात आता कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यावर आता महत्तवाची बातमी समोर येत आहे.
हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
निवडणुक आयोगाच्याच्या आयुक्तांची थेट सरकारद्वारे नियुक्ती सुप्रीम कोर्टाने बेकायदा ठरवली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी पार पडली. सरन्यायाधीश धंनजय चंद्रचुड यांनी याबाबत महत्वाचा निकाल दिला. तसेच केंद्रीय निवडणुक आयोगाच्या अध्यक्ष नेमुकीसाठी आता समितीची स्थापना होणार आहे. या समितीतत पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयातील सरन्याधीश असणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
महाराष्ट्र्च्या सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याआधी शिवसेना आणि धनुष्यबाणासंदर्भात निवडणुक आयोगात सुनावणी पार पडली. या सुनावणीत मतांच्या संख्येंच्या आधारे निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा निर्णय घेतला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत समितीमार्फत निवडणुक आयोगाची निवड व्हावी,अशी मागणी करण्यात आली होती.
Read also
- हेही वाचा..शिवाजीराव आढळराव पाटील, बारणेंवर शिंदेंचा विश्वास, सोपवली मोठी जबाबदारी
- हेही वाचा..राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा नाना काटे यांना फटका?
- हेही वाचा..भाजपचं टेन्शन वाढलं..! नवव्या फेरीत 2019 मध्ये मुक्ता टिळकांना २१,००० मताधिक्य होतं, त्यावर आता धंगेकरांची आघाडी
- हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती