मुंबई : काँग्रेसकडून राज्यभर केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आणि त्यामुळे वाढलेल्या महागाई विरोधात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, या आंदोलनाचे मुंबईतुन नेतृत्व करणारे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी यावेळी, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीवरून मोर्चा काढला.
बीडमध्ये भाजपला धक्का; प्रीतम मुंडेला डावलल्यामुळे तब्बल १४ जणांनी दिला राजीनामा
मात्र, आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी भरलेली बैलगाडी तुटली व काँग्रेस कार्यकर्त्यांसह भाई जगतापही खाली पडले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, राज्यातल्या भाजप नेत्यांना, काँग्रेसवर सडकून टीका करण्याचे आयतेच कोलीत मिळाले आहे.
“मी ईडीला भीक घालत नाही”, भास्कर जाधवांनी फोडली डरकाळी
भाई जगपात बैलगाडीवर उभे राहुन, मोदी सरकारविरोधात मोठ्याने घोषणा देत होते, सोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते ‘देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ ही घोषणा देत असताना, नेतेमंडळींचं ओझं वाढल्याने, अचानक बैलगाडी तुटली आणि भाई जगतापांसह सर्व नेते आणि कार्यकर्ते खाली कोसळले.
भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!
दरम्यान, आता यावरून भाजप आमदार श्वेता महाले यांनी, “समर्थकांनी फक्त नेत्याचे नाव घेतले आणि आख्खे लाचार कोसळले आणि खड्यात गेले. मात्र जनता हुशार आहे ते स्वतः व देशाला आता खड्यात जाऊ देणार नाही…. मुक्या जनावरांना कळतय ‘गाढवांचा’ भार उचलायचा नाही,” असे ट्विट करत कॉंग्रेसवर तोंडसुख घेतले आहे.
समर्थकांनी फक्त नेत्याचे नाव घेतले आणि लाचार कोसळुन खड्यात गेले.
मात्र जनता हुशार आहे ते स्वतः व देशाला आता खड्यात जाऊ देणार नाही .
मुक्या जनावरांना कळतय 'गाढवांचा' भार उचलायचा नाही. pic.twitter.com/HP2FroyfRO— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) July 10, 2021
तर, “गाढवांचा’ भार उचलायला, ‘बैलांचा नकार, भाई जगताप तुम्हाला सांगू इच्छितो की, “माणसाने झेपेल तेवढेच करावे, असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा!” अशा प्रकारचे स्टंट करून आणि मुक्या जनावरांना इजा पोचवून काँग्रेसला काय साध्य करायचं आहे ? अशी जोरदार टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ट्विट करत केली आहे.
'गाढवांचा' भार उचलायला, 'बैलांचा' नकार!
मा. @BhaiJagtap1 तुम्हाला सांगू इच्छितो की, "माणसाने झेपेल तेवढंचं करावं!"
असे पब्लिसिटी स्टंट करताना, त्या मुक्या जीवांचा विचार करावा! pic.twitter.com/dbceBpX6J5— Prasad Lad (@PrasadLadInd) July 10, 2021
भाजप राज्य मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही संधीचा फायदा घेत, “भाई जगताप तोल सांभाळा, महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना तुमचा राजकीय तोलच गेला आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेस कार्यकर्त कोसळले तसेच राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावेत याचा आधीच विचार करा,” असा सणसणीत टोला लगावला आहे.
तोल सांभाळा @BhaiJagtap1 . महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा. pic.twitter.com/OzvZelLRHt
— Keshav Upadhye (@keshavupadhye) July 10, 2021
आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ट्विट करून, “राहुल गांधी जिंदाबाद घोषणा देत असताना माणसाचे तर दूरच राहिले पण बैलालाही ते सहन झाले नसावे”, असा खोचक टोमणा मारला आहे.
.@BhaiJagtap1 यांच्या नेतृत्वात काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचं कस हसं झालं, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहीलं आहे. @RahulGandhi यांच्याबद्दलच्या घोषणा बैलांना देखील सहन झाल्या नाहीत, हेच यावरून दिसून येते. pic.twitter.com/tAnqaYfgYF
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 10, 2021
Read Also :
- कधी एकदा पार्थला आमदारकी, खासदारकी किंवा कारखाना मिळतोय, अजित पवारांना फक्त स्वतःच्या मुलाची चिंता!
- “शिवसेनेला वन खात्याची गरज नाही, कारण सेनेत आता वाघच शिल्लक नाहीत!”
- “नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
- उदय सामंत म्हणाले, “संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार”
- “केंद्राचे तिन्ही कृषी कायदे, ठाकरे सरकारने जसेच्या तसे लागू करावेत”