पुणे : समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. नागपूरवरून खासगी प्रवाशी बस ही पुण्याला जात होती. सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. त्यानंतर हा अपघात झाला. याच पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
हेही वाचा…भाजपच्या कॅनॉलमधून “राहुल कनाल” ला आता शुद्ध करणार का ? सुषमा अंधारेंचा भाजप अन् शिंदेंना सवाल
समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. २५ लोकांचा बळी जाणं ही बाब वेदना देणारी आहे. कदाचित शास्रीय दृष्ट्या नियोजन केलेलं नसावं. त्याचा दृष्परिणाम असा आहे. लोक मृत्यू होत आहेत. आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला. हा महामार्ग करण्याच्या काळात. नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांना लोक दोषी ठरवतात. असा टोला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
हेही वाचा…“बाळासाहेब आता हयात असते तर आदित्य ठाकरेंना लाथ मारून बाहेर काढलं असतं”
शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि पक्षाती सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले आहेत. शरद पवार गोवारी हत्याकांड विसरले आहेत. शरद पवार मावळचा गोळीबार विसरले आहे. शरद पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले आहे. हे सगळेच काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले. असे भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणत शरद पवारांना टिका केली आहे.
हेही वाचा…समृद्धी महामार्गावर “या” गोष्टी करा अपघात टाळा..! अपघात टाळण्यासाठी दानवेंनी सुचवल्या ‘सात’ गोष्टी
गोवारी हत्याकांड घडले, तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता पवार साहेब त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे. मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही. पवारसाहेब, या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का? पवारसाहेब, कंबरेचे सोडणारे तुम्ही आहात, हे तुम्ही आज दाखवूनच दिले. पवारसाहेब, तुम्ही आज मृतांच्या टाळूवरील लोणी खाणे, ही म्हणही सिद्ध करून दाखवली. असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईचे सगळे दरोडेखोर आज एकत्र जमले, चौकशा सुरू झाल्या अन्…,” एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
हेही वाचा…“ज्या दिवशी आमचं सरकार येईल, त्या दिवशी बुलडोझर चालवू”, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना इशारा
हेही वाचा…“अपघातात एखादा व्यक्ती गेला की लोक बोलतात, तो ‘देवेंद्रवासी’ झाला”, शरद पवारांचा फडणवीसांना टोला
हेही वाचा…“मला पप्पू बोलतात ना…पप्पू चॅलेंज देतो..या माझ्या अंगावर…छातीवर वार करा”, आदित्य ठाकरेंचं चॅलेंज
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेचा सातबारा फक्त शिवसेनेच्या बापाच्या नावावर”, धडक मोर्चातून राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल