मुंबई : नाना पटोले यांच्यानंतर रिक्त झालेले विधानसभा अध्यक्षपद, इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचे म्हणत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर इतरही काही महत्वाच्या मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतर आता, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून, याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अशीच तत्परता राज्यपाल, १२ आमदारांच्या नियुक्त्यांसंदर्भात कधी दाखवणार?
राज्याच्या विधानसभेचे पावसाळी अधिवशेषन ५ जुलै आणि ६ जुलै या २ दिवशी पार पाडणार आहे. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजूनही कोणताही निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात, भगतसिंग कोश्यारी यांनी, विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, अशी आठवण सरकरला करून दिली आहे. तसेच, अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासंदर्भात देखील राज्यपालांनी, मुख्यमंत्र्यांना कार्यवाही करण्याचे या पत्रात सांगितले आहे.
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पत्रात, कोश्यारी यांनी, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक, अधिवेशनाचा कालावधी आणि OBC आरक्षणाबद्दल, २३ जून २०२१ रोजी राजभवन येथे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मला दोन निवेदने सादर केली असून, ताईत वरील मुद्द्यांवर आग्रहाने मागणी केली असल्याचे म्हटले आहे. तसेच, उपरोक्त विषय अत्यंत महत्वाचे असल्यामुळे याबाबत आपण कार्यवाही करावी व मला त्याबाबत अवगत करावे, असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी आ. संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर
दरम्यान, या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांसाठी, व्हिप जारी केला असून, या अधिवेशनात शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके, यावर चर्चा-मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी या अधिवेशनाला उपस्थित राहायचे आहे, असा व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी जारी केला आहे.
Read Also :
- अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा, भाजपकडून थेट अमित शाहांना पत्र
- ठाकरे सरकारचा लसीकरणाबाबत मोठा निर्णय! केंद्र सरकारवर अवलंबून राहणार नाही
- “भाजपाने कुणा-कुणाची जात काढली, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, त्यांनी मला शहाणपणा शिकवू नये!”
- ‘या’ ६ मुद्यांवर ईडीला करायची अनिल देशमुखांची चौकशी! आता बजावणार तिसरे समन्स
- विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यास शाळांची मान्यता रद्द करू – वर्षा गायकवाड