मुंबई : ओबीसींना खऱ्या अर्थाने न्याय हा शरद पवार यांनीच दिला. राज्यातल्या प्रत्येक लहान घटकासोबत उभे राहण्याचे काम करणारे एकमेव नेते म्हणजे शरद पवार साहेब आहेत, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचे प्रकार सुरु केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांबद्दल कुणी काही बोललं तर चार तासात कारवाई होते. मात्र महात्मा जोतीबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्यावर गलिच्छ शब्दात लिखाण केल्याच्या गुन्ह्याची नोंद होते मात्र कुठलीही कारवाई होत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…शिट्या मारतात, टाळ्या वाजवतात, परंतु एकट्याच्या ताकदीवर राष्ट्रवादी निवडून आणता का ? अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाच सुनावले
पुढे बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. शालेय शिक्षणातून धडे वगळले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला केवळ एक पान दिले जात असेल, तर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या इतिहासाला किती पाने मिळतील, असा प्रश्न पडतो. वारकऱ्यांना मारहाण केली जात आहे. ३५० वर्षांची परंपरा असणाऱ्या वारकऱ्यांना मारहाण केली जाते.
हेही वाचा…छगन भुजबळ साहेब..! ओबीसी आरक्षणाचं काय झालं, ? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल
आज राज्यात हिंदू-मुस्लिम वाद घडविण्याचे काम सरकारप्रणित संघटनांमार्फत केले जात आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण केले जाते, पण कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम समाजासह सर्वांना पोटाशी धरले होते, त्यामुळे मुस्लिम बांधवांनी औरंगजेबाचा उदो उदो करू नये, असे आवाहन भुजबळ यांनी केले. राजसत्तेच्या पुढे जाण्याचा प्रयत्न धर्मसत्ता करत आहे. देशाची संसद ही पुरोगामी असली पाहिजे. मात्र ‘सेंगोल’ ची स्थापना करून लोकशाहीला तिलांजली देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालला पाहिजे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा…“पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असला पाहिजे”, खासदार अमोल कोल्हेंचं विधान
दरम्यान, देशाचे आणि राज्याचे मुख्य प्रश्न मागे पडत आहेत. देशात आणि राज्यात डबल इंजिन सरकार अशा घोषणा दिल्या जातात, मात्र तिकडे बेलासोरमध्ये तीन इंजिन एकावर एक धडकून अपघात झाला, तरी नैतिकता म्हणून राजीनामा दिला नाही. याआधी लालबहादूर शास्त्री, मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस, ममता बॅनर्जी, नितीश कुमार या रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अपघातानंतर राजीनामा दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. या देशाचे एक महत्त्वाचे राज्य असलेल्या मणिपूरमध्ये गेले चार महिने जाळपोळ सुरू आहे. मात्र केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. पंतप्रधान अमेरिकेत जातात मात्र मणिपूरमध्ये जात नाहीत, ही खेदाची गोष्ट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर राष्ट्रवादीचे ‘१००’ आमदार निवडून आणतील”
हेही वाचा…“केसीआर अन् वंचितबाबत सावध रहा,” अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुचना
हेही वाचा…“२५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा ‘भाजप’ पक्ष किती राक्षसी वृत्तीचा”
हेही वाचा…“अजित दादांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला, जयंत पाटील भर भाषणात गडबडले”, विरोधी पक्षनेते पद सोडणार
हेही वाचा…मोठी बातमी..! विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, अजित पवारांची शरद पवारांकडे मागणी