पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक घेण्याचे आदेश काल मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणुक आयोगाला दिले आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने मनमानी, कायद्याचे उल्लंघन करणारे बेकायदा असल्याचे नमुद करत आयोगाला मिळालेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले.
हेही वाचा…नागपुरात मोठा राडा, रोहित पवारांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, युवा संघर्ष यात्रा आक्रमक
अन्य राज्यातील निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यग्र असल्याने पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुक घेणे कठिण झाले होते, असा दावा केंद्रीय निवडणुक आयोगाने सोमवारी झालेल्या सुनावणीच्या दरम्यान केला होता. त्यावर पुण्यात मणिपुरसारखी अशांततेची परिस्थिती होती का ? अशी विचारणा करून न्यायालयाने आयोगाच्या या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच आयोगाचा हा दावा पटण्यासारखे नसल्याचेही सुनावले होते.
हेही वाचा…भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक पदी केतन महामुनी यांची नियुक्ती
मणिपुरमधील अशांततेच्या वातावरणासारखी स्थिती पुण्यात असती, तर आयोगाचे म्हणणे मान्य केले असते. परंतु, पुण्यात मणिपूरसारखी स्थिती होती का की त्यामुळे ही पोटनिवडणूक घेणे आयोगाला खूपच कठीण होते, अशी विचारणाही न्यायमूर्ती पटेल आणि न्यायमूर्ती खाता यांच्या खंडपीठाने आयोगाकडे केली होती. दुसरीकडे ही पोटनिवडणूक आता घेण्यात आली तरी विजयी उमेदवाराला फारच कमी काळ खासदारकी मिळेल असा दावाही आयोगातर्फे आला होता. त्यावर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आक्षेप घेतला.
हेही वाचा…“मी बाळासाहेबांचा शिवसैनिक तर शरद पवारांचा चेला”, नागपूरात संजय राऊतांचं विधान
तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील पद रिक्त झाल्यानंतरही आयोगाने इतर ठिकाणच्या पोटनिवडणुका घेतल्याकडे याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाचे लक्ष वेधले होते. न्यायालयानेही त्याची दखल घेतली होती. तसेच हा तपशील प्रतिज्ञापत्रद्वारे सादर करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या सगळ्या मागण्या मान्य करत असल्याचे सांगून याचिका निकाली काढल्या.
READ ALSO :
हेही वाचा…संसद घुसखोरीप्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक, दुपारी कोर्टात हजर केले जाणार
हेही वाचा…गुलाबी थंडीत नागपुरात राजकीय वातावरण तापलं, असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…मलिकांबाबत भाजपचा गैरसमज ; नवाब मलिक विषय अजित पवारांनी संपवला
हेही वाचा…अजिदादांवर राऊतांनी केलेली टिका झोंबली, अजित पवार गटाच्या ‘या’ नेत्याने दिला कडक इशारा
हेही वाचा...मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री भोपाळला रवाना, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी राहणार उपस्थित