नागपुर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वाची बैठक आज नागपुरात पार पडली. या बैठकीत भाजपने लोकसभेतील ४८ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहोत. त्यामुळे कुणीही जागांची चिंता करू नका, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. यावेळी पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा…पिंपरी चिंचवड महापालिकेतील दीड हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करा, अन्यथा.., महाविकास आघाडीने दिला इशारा
पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुती म्हणून तिन्ही पत्र एकत्रित लढणार आहोत. त्यासाठी कोणीही जांगाची चिंता करू नका. कारण तुमच्या मनातील जागा आपल्याला मिळणार आहेत. ज्या जागा आपण लढत नाहीत. त्याठिकाणी देखील मोदींचाच हात वर करण्यासाठी लढणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या ४८ मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोठी ताकद दिली पाहिजे. त्यामुळे आपल्याला या सर्व जागा जिंकायच्या आहेत.
हेही वाचा…नितेश राणेंचा नाशकात पुतळा जाळला, नितेश राणेंच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
दरम्यान, मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपुर येथे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपची बैठक पार पडली. त्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संबोधित करतांना देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर आरोप केले आहेत. त्यावर आता शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षणाला सर्वात जास्त विरोध शरद पवारांनी केला”, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
हेही वाचा...नितेश राणेंना मोठा झटका, कोर्टाने ‘तो’ अर्ज फेटाळला, ३० जानेवारील हजर राहण्याचे कोर्टाचे सक्तीचे आदेश
हेही वाचा…राज्यात गुंडाराज..! रिल्सस्टार मुलीला कारखाली चिरडलं, आरोपी मोकाट, विरोधकांचा सरकारवर संताप
हेही वाचा…“टीडीआर लॉबीची सुपारी घेऊन मोर्चा काढला जाणार”, फडणवीसांची ठाकरेंवर टिका
हेही वाचा…धारावीसाठी आज उद्धव ठाकरे मैदानात, कसा असेल ठाकरे गटाचा मोर्चा ?