पुणे : अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ अडचणीत सापडले आहेत. अलिकडेच्या दिवशी इडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या घरावर धाड टाकली. जवळपास साडे नऊ तास तपास केल्यानंतर इडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले. या प्रकरणावर आता हसन मुश्रीफांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर त्यांना दिलासा देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहेत.
हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
कागलमधील अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यानंतर इडीने हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. त्यावर हसन मुश्रीफ यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना दिलासा देत दोन आठवड्याची मुदत दिली होती.
हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
त्यावर आता ईडीने कथित गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफ यांना पुन्हा समन्स बजावले आहेत. त्यावर आता हसन मुश्रीफांची उद्या चौकशी होणार आहे. त्यामुळे उद्या ईडीच्या प्रश्नांना हसन मुश्रीफ काय उत्तर देणार? त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा…संसदेत ‘संजय राऊतांवर’ शिंदे गट मोठी कारवाई करण्याची शक्यता, थेट लोकसभा अध्यक्षांना पाठवलं पत्र
- हेही वाचा…“मला मुसलमानही माझ्यासोबत हवा, पण तो जावेद अख्तर ह्यांच्या सारखा”, राज ठाकरेंकडून जावेद अख्तरांचं कौतुक
- हेही वाचा…निमित्त बलिदान दिनाचे, चर्चा खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या अनुपस्थितीची..!
- हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..