पुणे । विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या समाधीस्थळी वढू- तुळापूर येथे शिव-शंभू प्रेमींची मोठी गर्दी असते. मात्र, संभाजी महाराज यांच्या नावाने मते मागणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘बलिदान दिनी’ छत्रपतींच्या समाधीस्थळाला भेटसुद्धा दिली नाही. त्यामुळे राज्यभरातील शिव-शंभू प्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा…““मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान”,आव्हाडांचा राज ठाकरेंच्या पोस्टरवरून टोला
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३३४ वा स्मृतीदिन धर्माप्रति बलिदान दिन म्हणून मानला जातो. या निमित्त वढू-तुळापूर येथे विविध कार्यक्रम पार पडले. पुणे जिल्ह्यातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिव-शंभू भक्तांनी समाधीस्थळी गर्दी केली. शासकीय महाभिषेक आणि विविध कार्यक्रमांद्वारे संभाजीराजे यांना अभिवादन करण्यात आले.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे हे केवळ खुर्च्याचे मुख्यमंत्री”, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टिका
छत्रपती संभाजी महाराज यांची अंत्ययात्रा न झाल्यामुळे या ठिकाणी ५५ ते ६० गावांतील तरुणांनी मिळून संभाजी महाराजांचे स्मरण करत ‘मूक पदयात्रा’ काढण्यात आली. तालुका आणि तालुक्याबाहेरील विविध गावांतील युवकांनी या ठिकाणाहून ज्वाला प्रज्वलीत करून आपापल्या गावी घेऊन गेले. सायंकाळी आपापल्या गावी मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी व पोलिस महासंचालक यांच्या उपस्थितीत शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे कीर्तन पार पडले. सर्व शंभूभक्तांच्या हस्ते समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मात्र, या कार्यक्रमांना स्थानिक खासदार किंवा शंभू प्रेमी म्हणून सुद्धा डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहिले नाहीत.
हेही वाचा…“अमृता फडणवीसांना लाच देणारे बुकी अनिल जयसिंघानी अन् त्याची मुलगी अनिक्षा, हिची समारोसमोर चौकशी होणार”
डॉ. अमोल कोल्हे यांना ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील नागरिकांनी घराघरात मान-सन्मान आणि आदराचे स्थान दिले. त्याच जोरावर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिरुर मतदार संघातून विजय मिळवला. किंबहुना, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर डॉ. कोल्हे यांनी मते मागितली. मात्र, निवडून आल्यानंतर शिवजन्मोत्सव, बलिदान दिन अशा कार्यक्रमांसाठी डॉ. कोल्हे यांना वेळ नाही. त्यामुळे शिव-शंभू प्रेमींची नाराजी ओढावून घेतली आहे. त्यामुळे बलिदान दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा डॉ. कोल्हे यांच्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
Read also
- हेही वाचा…पार्थ पवार शिरुर लोकसभेचे उमेदवार? वाढदिनी जोरदार फ्लेक्सबाजी!
- हेही वाचा…ज्यावेळी रवींद्र धंगेकर अन् हेमंत रासने आमनेसामने येतात, तेव्हा..
- हेही वाचा…“आम्ही तर वाट बघतोय की महाराष्ट्रात ‘राज’ कधी येणार ?” मनसेच्या बड्या नेत्याची पोस्टरवरून प्रतिक्रिया
- हेही वाचा…“मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींवर सत्ताधाऱ्यांचा डोळा, 12 हजार कोटी बजेटमधून काढले”
- हेही वाचा…“मग अमृता वहिनीच्या प्रकरणात देणाराच कसा दोषी ?” त्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादीचा सवाल