मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री दिल्ली दौरा केला. या दौऱ्याच्या वेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरून आता राज्यातील राजकीय नेत्यांनी टिकास्त्र सोडलं आहे. यातच राज्यातील नेते दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींची हुजूरगिरी करायला जातात, असा टोला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. त्यावर फडणवीसांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे गटातीलच आमदार सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार”, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
अमित शाह यांच्या भेटीत राज्यातील प्रमुख विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असंही ते म्हणाले. त्यानंतर नाना पटोलेंच्या टिकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. पटोले ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, तेथे टॉयलेटला जायचे असेल तर पक्षश्रेष्ठींची परवानगी घ्यावी लागले, त्यांनी आमच्यावर टीका करू नये. असा टोला फडणवीसांनी लगावला.
हेही वाचा…“राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेते एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“काही गोष्टींंचं तारतम्य आहे का नाही”, ? अजित पवार बावनकुळेंवर भडकले
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, शरद पवार जाहीर केले नाव
हेही वाचा…शरद पवारांचा एकेरी उल्लेख, तर रोहित पवारांना ‘माकड’ म्हणून संबोधले, पडळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टिका
हेही वाचा…पुणे जिल्ह्यात पवारांना शह देण्यासाठी भाजपाचा ‘फडणवीस पॅटर्न’, मंत्रीपदाच्या शर्यतीत आमदार महेश लांडगे ‘डार्क हॉर्स’
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार,” अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंचं वक्तव्य