ठाणे : शिवसेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांच्या मारहाणीविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने ठाण्यात राज्य सरकारच्या विरोधात महामोर्चा काढला आहे. या महामोर्चात शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, राजन विचारे, सुषमा अंधारे, विनायक राऊतांचा समावेश आहे. या वेळी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे आणि भाजपला आवाहन दिलं आहे. तसेच कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून केलेलं कामाबाबत आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“सततचा पाऊस ही राज्य सरकारकडून आता नैसर्गित आपत्ती घोषित”, राज्य सरकारचा मोठा निर्णय
ज्या फेसबुक लाईव्हमुळे उद्धव साहेबांवर भाजपने, ट्रोल्सने, गद्दार गॅंगने टीका केली. त्या फेसबुक लाईव्हमुळे आपली हालत सुरत सारखी झाली नाही. आपली हालत अहमदाबाद, उत्तर प्रदेशसारखी झाली नाही. इथे प्रत्येक जीव फेसबुक लाईव्हमुळे वाचला आहे. त्यामुळे आपले उद्धव साहेब कुटूंब प्रमुख झाले. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
हेही वाचा…“माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, सामने आओ..! तुम्हे तुम्हारा नाम भूला देंगे” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं ओपन चॅलेंज
त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. भ्रष्टाचाराच्या मागे भ्रष्टाचार, हे सरकारच घोटाळा घोटाळा झालं आहे. म्हणूनच सोबत टाळं आणलं आहे. कारण या सरकारला आता ‘चले जावं’, सांगण्याची वेळ आली आहे. या राज्यात महिलांवर हात उठतोच कसा? ते हात तिथेच ठेचले का जात नाही, हा विचार या मुख्यमंत्र्यांच्या मनात यायला हवा. पण त्यांच्या मनात खुर्च्या बसल्या आहेत. असा घणाघात देखील त्यांनी केला.
Read also
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्याठिकाणी हनुमान चालिसाचं पठण होईल”, नवनीत राणा
हेही वाचा…“फडणवीसांचा उल्लेख “फडतूस”, शिंंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ”
हेही वाचा…“डोक्यात खोक्याचा विचार असल्याने त्यांची तशी मानसिकता झालीय”, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका
हेही वाचा…“निदान आडनाव तरी सार्थकी लावा ताई”, मिटकरींनी चित्रा वाघ यांना डिवचलं
हेही वाचा…भारतीय जनता पक्ष – काल, आज आणि उद्या