मुंबई : महाविकास आघाडी सरकार असतांना मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण कार्यक्रमावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. नवनीत राणा यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. यातच आता राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर अन् आज हनुमान जयंती असल्याने अमरावतीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“माझं नाव आदित्य रश्मी उद्धव ठाकरे, सामने आओ..! तुम्हे तुम्हारा नाम भूला देंगे” अन् आदित्य ठाकरेंनी दिलं ओपन चॅलेंज
आता राज्यात हनुमान चालिसा पठण केल्याने कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. यावेळी आता कुणालाही तुरूंगात टाकणार नाही, कुणावरही देशद्रोहचा आरोप लागणार नाही. यातच ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा होतील. ते ठिकाण पवित्र करण्याचं काम लोकांनी केलं पाहिजे. तसेच लोकांनी मला बोलवलं तर त्याठिकाणी जाऊन हनुमान चालिसाचं पठण करून ते ठिकाण पवित्र करण्याचं काम करेन. असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…सभा ठाण्यात, अंधारेंनी धूर काढला पुण्यात ! भाजप नेत्याचा डान्सबारमधला विषय चव्हाट्यावर
ज्यावेळी मला १४ दिवस तुरूंगात टाकलं होतं. त्याच दिवशी मी एक संकल्पना केली होती. १११ मीटर उंचीची हनुमानाची मुर्ती आमच्या भागात उभी करेन. तसेच जे याला विरोध करतात. त्यांना ही हनुमानाची मुर्ती दिसायला हवी. यानंतर आता आमच्या चेहऱ्यावर शांती आली आहे. मागच्यावेळी विरोध,भीती सर्व होतं. कारण त्यावेळी रामलल्लाचं नाव घेणं हा देशद्रोह होता. त्यामुळे आता सरकार बदललं आहे. त्यामुळे आता कुणाचीही भीती राहिलेली नाही. असंही नवनीत राणा यांनी सांगितलंय.
Read also
हेही वाचा…“फडणवीसांचा उल्लेख “फडतूस”, शिंंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ”
हेही वाचा…“डोक्यात खोक्याचा विचार असल्याने त्यांची तशी मानसिकता झालीय”, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका
हेही वाचा…“निदान आडनाव तरी सार्थकी लावा ताई”, मिटकरींनी चित्रा वाघ यांना डिवचलं
हेही वाचा…भारतीय जनता पक्ष – काल, आज आणि उद्या
हेही वाचा…“सततचा पाऊस ही राज्य सरकारकडून आता नैसर्गित आपत्ती घोषित”, राज्य सरकारचा मोठा निर्णय