मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टाने विधानसबभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. परंतु अजूनही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून आता विरोधी पक्ष सातत्याने त्यांच्यावर टिका करीत आहेत. यातच अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक टिप्पणी केली आहे.
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार,” अमित शाह यांच्या भेटीनंतर शिंदेंचं वक्तव्य
कारल्याले कारले येऊ दे ग सूनबाई मग जाय आपल्या माहेरा पण कारल्याला काही कारलं येत नाही आणि सूनबाई काही माहेरी जात नाही अशीच एकंदरीत व्यवस्था आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा होईल असं म्हणत तुम्ही कशाला एवढं मनावर घेता. असं उत्तर बच्चू कडू यांनी पत्रकारांना दिलं. तसेच विस्तार झाला नाही तरी राज्यातील कामं झाली आहेत. असंही ते म्हणाले.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे गटातीलच आमदार सरकारच्या विरोधात जलसमाधी घेणार”, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्रीय मंत्री अमित शहांकडू ग्रीन सिग्रल मिळेल. अनेक ठिकाणी पालकमंत्री नाहीत. त्यामुळे विस्तार लवकरात लवकर करावं लागणार आहे. कालच्या बैठकीत अमित शाहांकडून विस्तारासाठी ग्रीन सिग्नल मिळला आहे. असंही रामदास आठवले म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“पटोलेंना त्यांच्या पक्षात टॉयलेटला जायचं असेल तरी परवानगी घ्यावी लागते”, फडणवीसांचा टोला
हेही वाचा…“काही गोष्टींंचं तारतम्य आहे का नाही”, ? अजित पवार बावनकुळेंवर भडकले
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, शरद पवार जाहीर केले नाव
हेही वाचा…शरद पवारांचा एकेरी उल्लेख, तर रोहित पवारांना ‘माकड’ म्हणून संबोधले, पडळकरांची राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टिका
हेही वाचा…पुणे जिल्ह्यात पवारांना शह देण्यासाठी भाजपाचा ‘फडणवीस पॅटर्न’, मंत्रीपदाच्या शर्यतीत आमदार महेश लांडगे ‘डार्क हॉर्स’