कोल्हापूर : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यातच आता विविध शहरात भाजपकडून कार्यकारिणी जाहीर करण्यात येत असून यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. तर काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना कार्यकारिणीतून डावलण्यात येत आहे. यातच आता कोल्हापूरात पदाधिकाऱ्यांतील अंसतोष टोकाला पोहचला आहे. पक्षाच्या विद्यमान धोरणामुळे भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट होत असल्याचं कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवण्यात येत आहे.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना अहवाल द्यावा लागणार, आतापर्यंत काय कारवाई झाली ?
कोल्हापूर जिल्हा हा मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गृहजिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मारूती राक्षे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे पक्षातील सद्यस्थितीवर नाराजी व्यक्त करत पक्षाच्या विद्यमान धोरणामुळे भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट होत असल्याचं म्हणत त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर नाराजी व्यक्त केलीय.
हेही वाचा…लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार,” माजी खासदाराचं मोठं भाकित
कोल्हापूरातील गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णयही यावेळी मारूती राक्षे यांनी जाहीर केला. गडहिंग्लजचे माजी तालुकाद्यक्ष मार्तंड जरळी यांनीही यावेळी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. मी गत ३२ वर्षापासून भाजपमध्ये काम करत आहे. यापुढेही काम करत राहिल. पण नव्या नियुक्त्या आम्हाला मान्य नाहीत असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात..,” पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक
गडहिंग्लज तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या रद्द होईपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णयही यावेळी मारुती राक्षे यांनी जाहीर केला. गडहिंग्लजचे माजी तालुकाध्यक्ष मार्तंड जरळी यांनीही यावेळी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. मी गत 32 वर्षांपासून भाजपमध्ये काम करत आहे. यापुढेही काम करत राहील. पण नव्या नियुक्त्या आम्हाला मान्य नाहीत, असे ते म्हणाले. नेत्यांनी आपल्या मर्जीतील काही खास लोकांना पदांची खिरापत वाटली. निष्ठावंतांवर अन्याय झाल्यामुळेच तालुक्यातील भाजपची स्थिती वाईट झाली. मर्जीतील लोकांना पदे देऊन पक्षाची घटना मोडीत काढण्यात आली. नव्या निवडी घटनाबाह्य आहेत. आजपर्यंत असे केव्हाच घडले नव्हते, असेही ते यावेळी म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“महिला आरक्षण सारख्या पवित्र कामासाठी देवाने मला निवडले”, मोदींच्या वक्त्यावरून सभागृहात गोंधळ
हेही वाचा…“जुने संसद भवन आता संविधान भवन”, लोकसभेच्या कामकाजाला नवीन संसद भवनात सुरुवात
हेही वाचा…पडळकरांवर फडणवीसांनी लवकर उपचार करावे, अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे की फडणवीस ? ट्विटरवर रंगली ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्पर्धा
हेही वाचा…महिलांना ३३ टक्के आरक्षण, मग हाच न्याय मराठ्यांना का नाही? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल