मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा निवडून आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा, पहिला विस्तार झाला. त्याची चर्चा अजूनही देशात सुरु आहे. यामध्ये ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश केला गेला असून, काहींना बढती मिळाली आहे, तर जुन्या १२ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला गेला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लगावले महाविकास आघाडी आणि भाजपला ‘मार्मिक’ टोले, वाचा सविस्तर
या पार्श्वभूमीवर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, प्रसार माध्यमांशी बोलताना, केंद्रात खातेबदल झाले, नवीन मंत्री झाले, पण डबे कितीही बदललेले, तरी काही उपयोग नाही, इंजिन बदलणे गरजेच आहे, ते सध्या देशाच्या जास्त हिताचं आहे,” असा हल्लाबोल मोदी सरकारवर केला होता.
पंकजा मुंडे पंतप्रधानांच्या भेटीला, भाजप आणि राज्याच्या राजकारणात होणार मोठी खळबळ?
त्यावर भाजपकडून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना, “नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात एक पप्पू आहे, तसाच राज्यात देखील एक पप्पू आहे. त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात”, असा हल्लबोल केला होता.
“नाना पटोले लहान आहेत, त्यांच्यावर मी काय भाष्य करणार?”
दरम्यान, नाना पटोलेंनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं असून, “चंद्रकांत पाटलांनी काहीही म्हटले, तरी आम्ही भाजप नेत्यांना ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’ म्हणणार नाही, ती आमची संस्कृती नाही. त्यांनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. मात्र, याने महागाई कमी होणार असेल, सर्वांना मोफत लस मिळणार असेल, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील, मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल, तर त्यांच्या टीकेचे स्वागत आहे,” अशी चपराक त्यांनी लगावली आहे.
Read Also :
- “सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत नाही आणि काँग्रेसमध्ये नाना पटोलेंना!”
- संजय राठोड यांचं होणार पुनर्वसन? मंत्री मंडळातल्या प्रवेशाबद्दल म्हणाले…
- शिवसेनेकडून ऑफर? उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रीया
- सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही
- “गैरसमजात राहू नका, माझं तिकीट कुणीही कापू शकत नाही”