पुणे : पुण्यात दोन दिवसांपुर्वी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. ना शायिस्तेखान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातून शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात. हे जगासमोर आहे ना. असं आव्हाडांनी म्हटलं होतं. त्यावरून आता स्वराज्य संघटनेचे नेते संभाजी राजे यांनी देखील आव्हाडांना इशारा दिला आहे.
हेही वाचा.. “पोटनिवडणुकांमध्ये आघाडीत मोठी बंडखोरी, दांभेकर अन् राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार”
जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहे. भाजपकडून जितेंद्र आव्हाडांचे पोस्टरही जाळण्यात आले. तर आव्हाडांच्या समर्थात राष्ट्रवादीनेही आंदोलने केलीत. यातच जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील. असा इशारा संभाजी राजे यांनी आव्हाडांना देण्यात आला आहे.
हेही वाचा.. काॅंग्रेसला 440 व्होल्टचा झटका, पटोले-थोरात वाद चव्हाट्यावर, थोरातांचा विधीमंडळ पक्षपदाचा राजीनामा
यातच काल जळगावमध्ये भाजपने जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टरही जाळले. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगावमध्ये आमदार सुरेश चव्हाण हे देखील जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले होते. राष्ट्रपुरूषांचा अपमान करण्याची परंपरा ही राष्ट्रवादीची आहे. केवळ मत मागण्यासाठी राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरात असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला.
हेही वाचा.. “नाना काटेंना उमेदवारी जाहीर होताच, राहुल कलाट्यांनी ठोकला शड्डू, चिंचवडची पोटनिवडणुक तिरंगी होणार ? “
दरम्यान, भाजपला धन्यवाद देतो. आमच्या यात्रेला प्रसिद्धी तुम्ही एका तासातच मिळवून दिलीत. आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा ह्या पहिल्याच परिषदेवर तुम्ही इतकी टिका केलीत. त्यामुळे ही यात्रा प्रत्येक घराघरात आता चर्चेचा विषय झाला आहे. बहुजनांचा इतिहास तुम्हांला का खुपतो? हेच आम्हांला समजत नाही. आमच्या परिषदेला तुम्ही घरोघरी पोहचवलात याबद्दल मी परत एकदा आपले मनापासून आभार मानतो. असं म्हणत आव्हडांनी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 7, 2023
Read also
- हेही वाचा.. “राहुल कलाट्यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी, सुनील शेळके कलाट्यांच्या भेटीला
- हेही वाचा..चिंचवड पोटनिवडणुकीत आपचा नेता ठरला..; उमेदवारी अर्ज सादर करणार
- हेही वाचा..चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कुणाचं पारडं जड..; राहुल कलाटे, नाना काटे, की अश्विनी जगताप ?
- हेही वाचा..“बाळासाहेब थोरातांशी चर्चा व्हायला हवी होती,” सत्यजीत तांबेंची प्रतिक्रिया
- हेही वाचा.. “अजित पवारांचे कट्टर समर्थक, ते माजी नगरसेवक, कोण आहेत आघाडीचे उमेदवार नाना काटे”?