मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांच्यावर जोपर्यंत सुनावणीची पुर्ण प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. यातच या प्रकरणाबाबत पुढील सुनावणी ही ८ जूनला होणार आहे. यात आता समीर वानखेडे प्रकरण संसदेत मुद्दा मांडणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“भाजपकडून पडळकरांना मंत्रीपद दिल्यानंंतर शिंदे साहेबांनी मग बिचकुलेंना मंत्रीपद द्यावं”, राष्ट्रवादीने डिवचलं
समीर वानखेडेंबाबत नवाब मलिक सातत्याने बोलत होते. ते कसं आता खरं व्हायला लागलंय. ते बघा. हे सगळं दुर्दैवी आहे. शाहरूख खानसारख्या मोठ्या फिल्मस्टारच्या मुलाचे असे हाल होत असतील तर या देशातील सर्वसामान्य जनतेच्या पोरांनी काय करावं? मी वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार आहे. केंद्र सरकारला विनंती आहे की, तुम्ही ईडी, सीबीआय काय वापरता ते वापरता. परंतु लोकांच्या घरात घुसून त्यांच्या मुलांवर अन्याय करू नका. असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा…सोलापुरात भाजपचा मोठा ‘मासा’ काॅंग्रेसच्या गळाला..! भाजप गोटात मोठी अस्वस्थता
दरम्यान, आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चर्चेत आले होते. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या बाबतीत अनेक गंभीर आरोप केले होते. तर आता आर्यन खान प्रकरणात सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…घरातले दागिने विकून, पैशांची उधळण करत शेतकरी आक्रमक, ७०० पेक्षा बोगस कंपन्यांंवर कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…“2024 नंतर ईडीच्या कारवायात ‘कुणाला’ तुरूंगात पाठवयाचं, त्या यादी तयार करू,” संजय राऊत
हेही वाचा…“ज्या पंतप्रधानांनी मोदींचे ‘चरणस्पर्श’ केले, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रंचड आरोप, काही काळ होते फरारी”
हेही वाचा…“आता ‘टिल्लूपासून उल्लु’पर्यंत आता सर्वांची वरात निघेल”, जयंत पाटलांच्या इडी कारवाईवरून राष्ट्रवादीने दिला भाजपला इशारा
हेही वाचा…“जयंत पाटलांसाठी राष्ट्रवादीचं ‘तुफान’ मुंबईत धडकलं..! ‘मोदी चोर है’च्या घोषणा