मुंबई : मुंबईच्या माणसांना मुंबईच्या बाहेर फेकण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आता त्यांच्याकडून भावनात्मक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी दोघांना कामाला लावलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर बोलेन पण आदित्य ठाकरेंवर बोलण्यासाठी त्यांची उंची नाही. अशी टिका शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी केली आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…ठाकरे गट मध्य प्रदेशात निवडणुका लढविणार का ? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
संजय राऊत म्हणाले की, रामदास कदमांसह शिवसेना सोडून गेलेले आमदार निवडणुकीला उभे राहतील तेव्हा कोणाची उंची किती आहे ते कळेल. तुम्ही निवडणुका घ्या. जे विधानसभा सदस्य पळून गेले आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला उभं राहावं. तेव्हा कोण किती उंचीच आहे ? ते कळेल. असं संजय राऊतांनी म्हटलंय.
हेही वाचा…“लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण..,” अजित पवार गटाचा वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर
रामदास कदम हे आमचे एकेकाळचे सहकारी आहेत. ते ज्या भाषेत बोलत आहेत, त्या भाषेत मी बोलणार नाही, त्यांचे आणि आमचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. ते आमचे जुने सहकारी आहेत. सहकारी म्हणून, मित्र म्हणून आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलं आहे. त्यांनी त्यांचा एक वेगळा मार्ग स्वीकारला आहे. ते चूकीच्या मार्गाने गेले आहेत. त्यांची कारणं त्यांच्यापाशी, पण शिवसैनिक आणि जनता ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीली शिवसेनेच्या पाठीशी असून येत्या निवडणुकीत कोकणात हे चित्र दिसेल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ज्या काँग्रेसी वृत्तीनं शिवरायांचा पुतळा पाडला, त्या काँग्रेससोबत..,” भाजपची ठाकरेंवर जोरदार टिका
हेही वाचा…‘तो’ फोटो का शेअर केला ? कानउघडणी करीत शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना खडसावलं
हेही वाचा…“दादांनी २ कोटींचा निधी तुम्हाला दिलाय, हा फक्त नमुना, यादी मोठी आहे,” अजित पवार गटाचा रोहित पवारांना प्रत्युत्तर
हेही वाचा…“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”
हेही वाचा…“शरद पवार भविष्यात नरेंद्र मोदींसोबत येतील,” बड्या आमदाराने बाप्पाकडे घातलं साकडं