मुंबई : आगामी काळात राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार असणार आहे, अशी चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. यातच काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या गोष्टीला तुजोरा दिला आहे. त्यामुळे आता राज्यात आता मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या यांच्या हस्ते कोथरुडच्या ‘त्या’ जिगरबाज पोलिसांचा सत्कार
आगामी लोकसभेच्या निवडणुकांचा विचार केल्यास एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप ही निवडणूक लढणार नाही, कारण ठाण्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव दिसत नाही. आता भाजपकडे अजित पवारांचा पर्याय आहे, त्यांना मुख्यमंत्री केलं जाईल. असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. तसेच येत्या १० ऑगस्ट दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतराबद्दल निर्णय होईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री हे अजित पवार होतील. त्यांना ती जबाबदारी आगामी लोकसभा निवणुक पाहता दिली जाईल. अशी शक्यता देखील चव्हाण यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाच्या आमदारासमोरच शिंदे गटातील आमदाराच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले, “आमची मैत्री कायम..”,
दरम्यान, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच सर्वांनाच अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं. असं राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. तर याआधी आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं होतं. त्याचबरोबर राज्यात देखील आता अजित पवारच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भुकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कार्यकर्त्यांना ताकद देणार अन् ‘अब की बार १२५ पार’ करणार.! नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा विश्वास
हेही वाचा…भाजप प्रवेशाच्या चर्चांना अशोक चव्हाणांनी दिलं पुर्णविराम, म्हणाले, “काॅंग्रेसमधीलच माझे हिंतचितकं….,”
हेही वाचा…अजित दादांची हाक..! वाढदिवसाचा खर्च टाळून इर्शाळवाडीच्या लोकांसाठी तब्बल ‘इतके’ रूपये झाले जमा
हेही वाचा…पश्चिम बंगालच्या घटनेवरून टिका करणाऱ्या भाजपच्या आमदाराला दानवेंनी चांगलचं सुनावलं, म्हणाले, त्या महिलांचा..
हेही वाचा…“..तर महाराष्ट्रांच्या गल्ल्यांमध्ये कोण फिरणार ?”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल