नागपूर : हिवाळी अधिवेशनात आज समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी एनआयच्या कारवाईवर पॉंईट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर सभागृहात भाजपचे आमदार अबू आझमीवर तुटून पडले. आझमी यांनी एनआयए कारवाईचा मुद्दा उपस्थित करताच आमदार महेश लांडगे, योगेश सागर, राम सातपूते आणि आशिष शेलार यांनी बोलायला सुरूवात केली आणि अबू आझमींचा मुद्दा यांनी खोडून काढला.
हेही वाचा…“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या मस्जिदमध्ये छापा टाकून देशविघातक कारवाई केल्याप्रकरणी एका डॉक्टरला अटक झाली. त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून सुरक्षा यंत्रणांनी ४० जणांना अटक केली. आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते कोणत्याही विचाराचे असोत, पण हा देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहीला पाहिजे. त्यासाठी कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात केली.
हेही वाचा…अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ‘‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही. पण, काळ सोकावला नाही पाहिजे…’’ अशी भूमिका घेत सर्वच राजकीय पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करीत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून देशविरोधी प्रवृत्तींना ठेचून काढल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी रोखठोक भूमिका लाडंगे यांनी सभागृहात मांडली.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा नाशिक लोकसभेचा फॉर्म्युला ठरला ? ठाकरेंच्या उमेदवारांचा पवार प्रचार करणार ?
हेही वाचा…मध्यप्रदेशचा नवा मुख्यमंत्री ठरला..! भाजपकडून मोहन यादवांच्या नावावर शिक्कामोर्तेब
हेही वाचा…“जम्मू-काश्मीरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका घ्या,” सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश
हेही वाचा..“माजी आमदाराकडून मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीसांत शेजाऱ्यांनी दिली तक्रार”
हेही वाचा…केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने विरोधी कसा ? दानवेंनी दिलीत तीन ज्वलंत उदाहरणे