नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांवर रितसर सुनावणीही पार पडली. त्यानंतर मात्र कोर्टात याचिकांवर निकाल राखून ठेवला आणि ५ सप्टेंबर रोजी या याचिकांवर १६ दिवस सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निकाल आज ११ डिसेंबर रोजी दिला आहे. केंद्र सरकारकडून सुनावणी दरम्यान जोरकसपणे बाजू मांडण्यात आली. त्याचबरोबर याचिकाकर्त्यांकडूनही आक्रमक युक्तविदा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाकडून या प्रकरणात तीन निकाल देण्यात आले आहेत.
हेही वाचा..मोठी बातमी..! यंदाचा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सुप्रसिध्द गीतकार व लेखक जावेद अख्तर यांना जाहीर
केंद्रातील मोदी सरकारने संविधानाताील अनुच्छेध ३७० हटवण्याचा घेतला निर्णय योग्यच असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय देताना जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याकाळा युद्धाची परिस्थिती पाहून ३७० कलम तयार करण्यात आलं होतं. हे कलम तात्पुरतं ठेवण्यात आलंहोतं. ते आता बदलता येऊ शकत होतं. हे कलम निरस्त करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य प्रक्रियेनुसार निर्णय घेतला असून जम्मू काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे. भारताच्या अनुच्छेद १ पासून ते ३७० पर्यंत स्पष्ट आहे. असं म्हणत जम्मू-काश्मिरला राज्याचा दर्जा देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
हेही वाचा…“तु ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवं”; भुजबळांनी जरांगे पाटलांना पुन्हा डिवचलं
दरम्यान, या सुनावणीसाठी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचुड, न्यायाधीश संजय किशन कौल, न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश बीआर गवई आणि न्यायाधीश सुर्यकांत यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कोर्टाने निवडणूक आयोगालाही आदेश दिले असून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या असंही म्हटलं आहे. भारताचं अविभाज्य अंग भारताता विलिनीकरण झाल्यानंतर जम्मू-काश्मीर सार्वभौम राज्य राहिलं नाही. जम्मूःकाश्मीरमध्ये आता त्यांची संविधान सभा नाही असंही कोर्टाने म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा..“माजी आमदाराकडून मारहाण, जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीसांत शेजाऱ्यांनी दिली तक्रार”
हेही वाचा…केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने विरोधी कसा ? दानवेंनी दिलीत तीन ज्वलंत उदाहरणे
हेही वाचा…“महाराष्ट्राचा ८३ वर्षाचा तरूण योद्धा…,” शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात, ‘या’ ठिकाणी होणार मोठं आंदोलन
हेही वाचा…अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण ? राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, इंदापुरात मराठा समाज आक्रमक