ठाणे : ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटात मोठा राडा झाला. यावेळी शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या नेत्या रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. यानंतर ठाकरे गटाकडून ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रूग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. आता यावरून रोशनी शिंदे यांचा आनंद दिघे होण्याची भिती शिंदे गटाच्या नेत्या आणि ठाणे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“निदान आडनाव तरी सार्थकी लावा ताई”, मिटकरींनी चित्रा वाघ यांना डिवचलं
मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, ज्यावेळी आनंद दिघेसाहेब अॅडमिट होते. तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना भेटण्यासाठी येऊन गेले. भेटून बाहेर आले. त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात आनंद दिघे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याबाबत ठाणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्या अर्ध्या तासात नेमकं काय घडलं? याचा खुलासा झाला पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा…भारतीय जनता पक्ष – काल, आज आणि उद्या
तसेच पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आनंद दिघे यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आत्तापर्यंत मिळालेला नाही. त्यांच्याबरोबर काय झालं हे नक्की कोणालाही माहिती नाही. ठाणेकरांच्या मनामध्ये संशय आहे. तसेच रोशनी शिंदे यांच्या जीवाला ठाकरे गटाकडून धोका आहे. त्यामुळे रोशनी शिंदेला संरक्षण मिळावं. असंही त्यांनी म्हटलंय.
Read also
हेही वाचा..“सुषमा अंधारे अन् राखी सावंत बहिणी-बहिणी, सनसनाटी पसरवणाऱ्यामध्ये त्यांच्यात स्पर्धा,” भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान
हेही वाचा…“प्रत्येक जीव फेसबुक लाईव्हमुळे वाचला, त्यामुळे आपले उद्धव साहेब ‘कुटूंब प्रमुख’ झाले”, आदित्य ठाकरे
हेही वाचा…“उद्धव ठाकरे ज्या ज्या ठिकाणी सभा घेतील, त्या त्याठिकाणी हनुमान चालिसाचं पठण होईल”, नवनीत राणा
हेही वाचा…“फडणवीसांचा उल्लेख “फडतूस”, शिंंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की, “सत्तेच्या खुर्चीसाठी सर्व खेळ”
हेही वाचा…“डोक्यात खोक्याचा विचार असल्याने त्यांची तशी मानसिकता झालीय”, नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टिका