मुंबई : सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १५ ऑगस्ट १९४७ हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस होऊ शकत नाही. असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यावर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा…“टिकाटिपण्या, फोडाफोडीचं राजकारण, दडपशाही यातून जर सवड मिळाली तर..” काॅंग्रेसचा फडणवीसांवर निशाणा
जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी १८९८ रोजी हे राष्ट्रगीत इंग्लंडच्या राज्याच्या स्वागतासाठी लिहिले होते. त्यामुळे १५ ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही. उलट या दिवशी भारताची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करून दुखवटा पाळावा असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…खडसे अन् गुलाबराव पाटलांमध्ये समझोता, तडजोड..! ‘त्या’ प्रकरणाला लागला पुर्णविराम
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे. भिडेचे नवे किडे या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे. देशद्रोही भिडे राष्ट्रगीत जुमानत नाही. देशद्रोही भिडे स्वातंत्र्यदिन मानत नाही. शेतातला आंबा खाऊन नाहीतर जुलुमी इंग्रजांचे हाल सोसत निधड्या छातीने लढून आपल्या देशाला स्वातंत्र्य लाभले आहे. नाठाळांच्या माथी, कायद्याची काठी हाणायला हे सरकार कचरतंय कारण हे गुरुजी यांच्याच गुरूंचे गुरु लागतात म्हणे. असा हल्लाबोल काॅंग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“‘बाळासाहेबांना म्हातारा’, असं संबोधन करणाऱ्या सुषमा अंधारे तुमच्या नेते कश्या?”, मनसेचा सवाल
दरम्यान, संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताला राजकीय स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालं. देशाची फाळणी झाल्याचं शल्य आपल्या मनात आहे. आपल्या सगळ्यांना अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत पाहू तेव्हाच आपल्या मनाचं समाधान होईल. याचा अर्थ १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन नाही, असं कोणी त्या अर्थाने म्हणत असेल तर ते योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
भिडे चे नवे किडे.. या वृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे.
देशद्रोही भिडे राष्ट्रगीत जुमानत नाही
देशद्रोही भिडे स्वातंत्र्यदिन मानत नाहीशेतातला आंबा खाऊन नाहीतर जुलुमी इंग्रजांचे हाल सोसत निधड्या छातीने लढून आपल्या देशाला स्वातंत्र्य लाभले आहे. नाठाळांच्या माथी, कायद्याची काठी… pic.twitter.com/EUTC8pl4NT
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 27, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“..तर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”
हेही वाचा…“कालच्या प्रकरणावरून शिंदे-फडणवीसांच्या भक्तगणांनी बांगड्या फोडायला सुरूवात केली”, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना समन्स…! ‘या’ प्रकरणात १४ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
हेही वाचा…पुण्यात दिवसा ढवळ्या तरूणीवर कोयत्याने हल्ला..! “गृहमंत्र्यांनाही बहुथा राजकीय..,” अजित पवारांचा घटनेवर संताप
हेही वाचा…एकनाथ शिंदेंचा एक आदेश अन् राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ‘१८’ नगरसेवक ‘सहा’ वर्षासाठी निलंबित